एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती.
हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला,
`सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?'
तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते;
कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.'
हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की,
नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते,
तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया.
मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला.
तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.
तात्पर्य : मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले ?
मारुति हा श्रीरामाचा भक्त होता. त्याचे रामावर फार प्रेम होते.
रामासाठी काय वाटेल ते करायला तो सिद्ध होता.
म्हणूनच श्रीरामाचा सगळयात जवळचा भक्त मारुति होता.
आपणसुद्धा सेवा करायला पटकन पुढे आलो, तर देवाची लाडकी मुले होऊ.

हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला,
`सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?'
तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते;
कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.'
हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की,
नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते,
तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया.
मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला.
तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.
तात्पर्य : मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले ?
मारुति हा श्रीरामाचा भक्त होता. त्याचे रामावर फार प्रेम होते.
रामासाठी काय वाटेल ते करायला तो सिद्ध होता.
म्हणूनच श्रीरामाचा सगळयात जवळचा भक्त मारुति होता.
आपणसुद्धा सेवा करायला पटकन पुढे आलो, तर देवाची लाडकी मुले होऊ.







रामानुजाचार्य
शठकोपस्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य
सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण
रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले,
ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना
देण्यास प्रारंभ केला. शठकोपस्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार
संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ''माझी आज्ञा मोडून तू
साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय
होईल तुला ठाऊक आहे का ?''
