Tuesday 12 March 2013

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती !

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती ! 




१. छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त असल्याने समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत असणे आणि इतर शिष्यांना ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात’,असे वाटल्याने समर्थांनी त्यांचा संशय दूर करण्याचे ठरवणे 

         ‘छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. हे पाहून इतर शिष्यांना वाटले, ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात.’ समर्थांनी त्यांचा संशय तात्काळ दूर करण्याचे ठरवले. ते शिष्यांसमवेत रानात गेले. तेथे गेल्यावर सर्वजण मार्ग चुकले आणि समर्थ एका गुहेत पोट दुखण्याचे ढोंग करून झोपले. शिष्य आल्यावर त्यांनी पाहिले की, गुरुजी वेदनेमुळे कण्हत आहेत. त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला. समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. दुर्बळ मनाचे लोक आणि ढोंगी भक्तांची जशी हालचाल असते, तसे वातावरण बनले.
   






२. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आल्याने शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारणे आणि त्यांनी भयंकर पोट दुखतअसल्याचे सांगून यावर वाघिणीचे ताजे दूध हेच औषध असल्याचे सांगणे

         इकडे छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी निघाले. त्यांना समजले की, समर्थ याच रानात कुठेतरी आहेत. शोध घेत घेत ते एका गुहेजवळ आले. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आला. आत जाऊन बघितले, तर साक्षात् गुरुदेवच कासावीस होऊन कूस पालटत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारले.
समर्थ : शिवा, भयंकर पोट दुखत आहे.
शिवाजी महाराज : गुरुदेव, यावर औषध ?
समर्थ : शिवा, यावर काहीही औषध नाही. असाध्य रोग आहे. एकच औषध काम करू शकते; पण जाऊ दे.
शिवाजी महाराज : गुरुदेव, निःसंकोच सांगा. गुरुदेवांना स्वस्थ केल्याविना शिवा शांत बसू शकत नाही.
समर्थ : वाघिणीचे दूध आणि तेसुद्धा ताजे काढलेले; पण शिवा, ते मिळणे अशक्य आहे.
  

३. शिवाजी महाराज वाघिणीच्या शोधार्थ निघणे, एके ठिकाणी वाघाचे दोन छावे दिसणे, पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून वाघीण गुरगुरणे आणि शिवाजी महाराजांनी वाघिणीला नम्रपणे प्रार्थना करून पाठीवरून हात फिरवणे

         शिवाजी महाराजांनी जवळ असलेले कमंडलू उचलले आणि समर्थांना नमस्कार करून ते लगेच वाघिणीच्या शोधात निघाले. थोडेसे दूर गेल्यावर एके ठिकाणी दोन वाघाचे छावे दिसले. महाराजांनी विचार केला, ‘निश्चित येथे यांची आई येईल.’ योगायोगाने तीही आली. आपल्या पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून ती महाराजांवर गुरगुरु लागली. महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते; परंतु येथे लढायचे नव्हते, तर वाघिणीचे दूध काढायचे होते. त्यांनी धैर्य धारण केले आणि हात जोडून ते वाघिणीला विनंती करू लागले, ‘माते, मी येथे तुला मारायला किंवा तुझ्या पिलांना न्यायला आलेलो नाही. गुरुदेवांना स्वस्थ करण्यासाठी तुझे दूध पाहिजे. ते काढू दे. गुरुदेवांना देऊन येतो, मग भले तू मला खा.’ शिवाजी महाराजांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला.
  



४. वाघिणीचा क्रोध शांत होऊन ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागणे, महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढून कमंडलू भरणे आणि तिला नमस्कार करून गुहेत पोहोचल्यावर समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकणे

         मुके प्राणीसुद्धा प्रेमाला वश होतात. वाघिणीचा क्रोध शांत झाला आणि ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागली. संधी पाहून महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढले आणि कमंडलू भरून घेतले. तिला नमस्कार करून ते अतिशय आनंदाने तेथून निघाले. गुहेत पोहोचल्यावर गुरुदेवांपुढे दुधाने भरलेले कमंडलू ठेवत महाराजांनी गुरुदेवांना नमस्कार केला. ‘‘शेवटी तू वाघिणीचे दूध घेऊन आलास ! धन्य आहे शिवा ! तुझ्यासारखे एकनिष्ठ शिष्य असतांना गुरूंची वेदना काय राहू शकते ?’’ समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकली.
         आता शिष्यांना कळून चुकले की, ब्रह्मवेत्ता गुरु जर एखाद्या शिष्यावर प्रेम करत असतील, तर त्याची विशेष योग्यता असते. तो विशेष कृपेचा अधिकारी असतो. ईर्षा केल्याने आपली दुर्बलता आणि दुर्गुण वाढतात; म्हणून अशा विशेष कृपेचे अधिकारी असणार्‍या गुरुबंधूंना पाहून ईर्षा करण्यापेक्षा आपली दुर्बळता अन् दुर्गुण दूर करण्यात तत्पर राहिले पाहिजे.’

गोवर्धन पर्वत

गोवर्धन पर्वत 




        भगवान श्रीकृष्ण सर्वांना ठाऊक आहे ना ? तो गोकुळात रहायचा. तेथे गोवर्धन नावाचा मोठा पर्वत होता. गोकुळात श्रीकृष्णासमवेत सगळे गोप-गोपी आनंदाने रहात होते. प्रतिवर्षी ते पाऊस पडावा; म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे. एकदा इंद्राला गर्व झाला की, मी पाऊस पाडत असल्यामुळे सगळे चालले आहे. हे श्रीकृष्णाने ओळखले. कारण श्रीकृष्णाला `प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे', ते सगळेच समजते. श्रीकृष्ण गोपगोपींना म्हणाला, ``अरे, या गोवर्धन पर्वतामुळेच आपल्याला पाऊस मिळतो. तेव्हा आपण इंद्राची नको, गोवर्धन पर्वताचीच पूजा करूया. तेव्हापासून गोपी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले.
           


Read vigyan ( Please Add skeep ) ......................... 




हे पाहून इंद्राला राग आला. त्याने जोराने मुसळधार पाऊस पाडायला प्रारंभ केला. त्यामुळे नदीचे पाणी वाढू लागले. सगळेजण घाबरले आणि श्रीकृष्णाजवळ गेले. श्रीकृष्ण म्हणाला, ``अरे, ज्या पर्वताची तू पूजा केली, तोच वाचवेल आपल्याला! आपण सगळे संघटित होऊया.'' मग गोपगोपी आपापल्या काठ्या घेऊन एकत्र आले. त्या वेळी श्रीकृष्णाने काय केले ठाऊक आहे का ? गोवर्धन पर्वत आपल्या हाताच्या एका करंगळीवर उचलला. त्या वेळी मोठा आवाज झाला. मग गोपगोपींनीही आपापल्या काठ्या त्या पर्वताला लावल्या. सर्वांना पर्वताखाली आश्रय मिळाला. इकडे इंद्राकडचे ढग संपले.
          
        अशा प्रकारे श्रीकृष्णाने मुसळधार पावसापासून सर्व गोपगोपींचे रक्षण केले आणि गोपगोपी यांनीही काठ्या लावून त्याच्या कार्यात साहाय्य केल्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न झाला. सेवा केल्यामुळे गोपगोपी मोक्षाला गेले.

रामभक्त हनुमान

रामभक्त हनुमान 




 


एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, `सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?' तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया. मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.     


Read Mrathi News ( Please Skeep Add ) .................................................

सत्सेवेचे महत्त्व

सत्सेवेचे महत्त्व 



  प्रभु श्रीराम रावणाच्या कह्यातून सीतेला सोडवण्यासाठी लंकेला निघाले. त्या वेळी वाटेत समुद्र होता. हा समुद्र ओलांडून त्यांना लंकेला जायचे होते. समुद्रावरून कसे लंकेला जाणार ? मग वानरसेना आणि मारुतीने ठरवले की, आपण समुद्रात दगड टाकून सेतू बांधूया आणि त्याच्यावरून चालत आपण लंकेला जाऊया. प्रत्येक जण श्रीरामाचा नामजप दगडावर लिहून नामस्मरण करत समुद्रात दगड टाकू लागले. तर काय आश्चर्य ! ते दगड पाण्यावर तरंगू लागले आणि काही दिवसांतच सेतू सिद्ध झाला.     


Read Joke ( Please Add Skeep ) ..................... 



जेव्हा सगळे वानर सेतू बांधत होते, तेव्हा त्यांना एका छोट्याशा खारुताईने बघितले. ती मनात म्हणाली, 'श्रीराम तर देवच आहे. त्याच्या कामासाठी हे वानर पूल बांधत आहेत. मग मीपण त्यांना साहाय्य करते. ही तर श्रीरामाची सेवा आहे.' मग ती जवळच्या एका वाळूच्या ढिगाऱ्यावर गेली आणि तिच्या हातून छोट्याशा हातात छोटे दगड आणि वाळू घेऊन समुद्रात नेऊन टाकू लागली. हे बघून वानरांना आश्चर्य वाटले. एका वानराने तिला म्हटले, ''ए चिमुरडे, तू कण कण वाळू आणून टाकतेस. त्याने काय सेतू बांधून होणार आहे का ? तेव्हा खारूताई म्हणाली, ''वानरदादा, मी मोठे दगड नेऊ शकत नाही. तुमच्यासारखा सेतू बांधू शकत नाही; पण मी माझा खारीचा वाटा तरी उचलते. माझ्याकडून श्रीरामाची सेवा होऊ दे. छोटी असली, तरी चालेल.'' असे म्हणत खारुताई परत वाळू घेऊन समुद्रात टाकण्याची सेवा करू लागली. असे बराच वेळ केल्यावर ती दमली; पण तरी न थांबता तिच्या खेपा चालूच होत्या. ती मनात काय म्हणत होती, ते ठाऊक आहे ? ती म्हणत होती, 'माझ्या अंगात जोपर्यंत शक्ती शिल्लक आहे, तोपर्यंत मी श्रीरामाची सेवाच करत रहाणार. पुन्हा वाळू घेऊन समुद्राकडे जातांना तिच्याकडे कोणीतरी प्रेमाने बघितले, कोण होते ते सांगा ? प्रत्यक्ष प्रभु श्रीरामाने तिला बघितले आणि खारुताईला हातात उचलले. श्रीराम तिला म्हणाला, ''खारुताई तू छोटी आहेस; पण फार चांगली सेवा केलीस. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. श्रीरामाने आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी खारुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. 

तेव्हा खारुताईच्या पाठीवर देवाच्या बोटांचे ठसे उमटले. बघा, आपल्याला खारीच्या पाठीवर ठसे दिसतात कि नाही. श्रीराम खारुताईला म्हणाला, ''जो कोणी तुझ्यासारखी सेवा करेल, त्याच्यावर मी नेहमी कृपा करीन. त्याला कधी काही न्यून पडणार नाही. बघा, देवाची कृपा झाली की, आपल्याला कधीच काही न्यून पडत नाही. मग देवाची कृपा कधी होणार ? खारुताईवर देवाची कृपा का झाली ? 


Read Samaj ( Please Add Skeep ) ............................................

गणपति

गणपति 



  


बालमित्रांनो, गणपति ही विद्येची देवता होय. हा आपल्याला चांगली बुद्धी देतो. सर्व विघ्ने दूर करणारा देव म्हणून त्याला 'विघ्नहर्ता' असेही म्हणतात. त्याच्या इतर नावांपैकी 'चिंतामणी' हे नाव त्याला कसे मिळाले, ते आज आपण पाहू.

        कण नावाचा एक दुष्ट राजपुत्र होता. तो दीनदुबळयांना त्रास देत होता. ऋषीमुनींच्या तपात अडचणी निर्माण करत होता. एकदा तो आपल्या साथीदारांसह रानात शिकारीस गेला. त्याच रानात कपिलमुनींचा आश्रम होता. त्यांनी कणाचे स्वागत केले आणि त्याला आपल्या साथीदारांसह जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. कपिलमुनींची झोपडी (आश्रम) पाहून कणाला हसू आले. तो म्हणाला, ''तुमच्यासारखा गरीब साधू एवढ्या लोकांना काय जेवू घालणार ?'' त्यावर कपिलमुनींनी आपल्या गळयात साखळीला लावलेला 'चिंतामणी' काढून तो एका चौरंगावर ठेवला. त्या मण्याला नमस्कार करून त्यांनी प्रार्थना केली. त्यामुळे तेथे एक जेवणघर निर्माण झाले. सर्वांना बसण्यासाठी चंदनाचे पाट आणि चौरंग मांडलेले होते. चांदीच्या ताटवाट्यांमध्ये अनेक प्रकारची पक्वान्ने वाढलेली होती. कण आणि त्याचे साथीदार ते स्वर्गीय जेवण जेवून संतुष्ट झाले.
        कणाला तो मणी प्राप्त करण्याची आशा झाली. त्याने आपली इच्छा कपिलमुनींकडे व्यक्त केली; परंतु कणाचा स्वभाव ठाऊक असलेल्या कपिलमुनींनी त्यास नकार दिला. त्यावर त्याने अत्याचाराने तो मणी हिरावून घेतला.  



त्यानंतर कपिलमुनींनी गणपतीची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने कणाला शिक्षा करायचे ठरवले. इकडे त्या मण्यासाठी कपिलमुनी आपल्याशी युद्ध करतील, असा ग्रह करून कण कपिलमुनींवर चाल करून गेला. गणपतीच्या कृपेने त्या रानात फार मोठे सैन्य निर्माण झाले. त्यांनी कणाच्या जवळजवळ सर्व सैनिकांना मारले. तेव्हा गणपति स्वत: रणांगणावर आला. त्यावर कणाने भराभर गणपतीवर बाण सोडायला प्रारंभ केला; पण गणपतीने ते हवेतच आपल्या बाणांनी अडवले. मग गणपतीने आपला परशू कणावर फेकला. तो लागताच कण मरून पडला. कणाचे वडील राजा अभिजीतने रणांगणावर येऊन गणपतीला नमस्कार केला. कपिलमुनींचा 'चिंतामणी' त्यांना परत दिला. आपल्या मुलाला क्षमा करून सदगती द्यावी, अशी अभिजीतने गणपतीला विनवणी केली. दयाळू गणपतीने त्याचे म्हणणे मान्य केले.
        गणपतीने कपिलमुनींना चिंतामणी परत मिळवून दिला; म्हणून गणपतीला 'चिंतामणी' असे नाव पडले.


दुष्ट वालीचा वध

दुष्ट वालीचा वध 



बालमित्रांनो, रामनवमीला प्रभु श्रीरामाचा जन्म झाला. आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो. आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले, ते आज आपण पाहू.

        वाली आणि सुग्रीव हे दोघे भाऊ किश्किंदा नगरीत रहात होते. दोघांचेही एकमेकांवर फार प्रेम होते. त्यांच्यापैकी वाली हा मोठा असल्यामुळे तो त्या नगरीचा राजा होता. एकदा मायावी नावाचा एक बलाढ्य राक्षस त्या नगरीत आला. वाली आणि तो राक्षस यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. दोघेही तितकेच पराक्रमी होते. युद्ध करत ते दोघेही एका गुहेत शिरले. गुहेच्या दाराशी उभ्या असलेल्या सुग्रीवला गुहेत फार भयंकर युद्ध चालले असल्याचे आतून ऐकू येणाऱ्या आवाजामुळे समजले. अचानक एका मोठ्या आवाजासह रक्ताचा पाट गुहेतून येतांना दिसला. ते पाहून आपल्या भावाला वीरगती प्राप्त झाली, असे सुग्रीवला वाटले. मायावी राक्षस आता गुहेतून बाहेर येऊन आपल्यालाही मारून टाकेल, या भीतीने सुग्रीवने एका मोठ्या दगडाने गुहेचे दार बंद करून तो नगरीत परतला. आपला भाऊ आपल्याला सोडून गेल्याचे दु:ख सुग्रीवला होते; परंतु लोकांच्या आग्रहास्तव आणि वालीचा मुलगा वयाने लहान असल्यामुळे शेवटी सुग्रीवने राज्याभिषेक करवून घेतला. 


काही दिवसांनंतर वाली परत आला. तेव्हा राज्याच्या लालसेने सुग्रीवने आपल्याला धोका दिला, असा त्याचा गैरसमज झाला. त्यामुळे त्याला अतिशय राग आला. रागाच्या भरात त्याने आपल्या प्रिय भावाला राज्यातून हाकलून लावले आणि त्याच्या पत्नीला बंदिस्त केले. आपल्या बलाढ्य भावाच्या रागाला घाबरून सुग्रीव पळाला आणि ऋष्यमूक डोंगरावर सुरक्षित राहिला. वालीला मातंगऋषींचा शाप असल्यामुळे तो तेथे येऊ शकत नव्हता.
        मध्यंतरी राम आणि लक्ष्मण हे दोघेही सीतेच्या शोधात या डोंगराच्या जवळून जात होते. ते पाहून हनुमंताने ही माहिती सुग्रीवाला सांगितली. त्या क्षणी सुग्रीवने जाऊन रामाचे पाय धरले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी सांगितले. सर्व शांतपणे ऐकून घेतल्यानंतर रामाने सांगितले, ''मातेसमान असलेल्या आपल्या वहिनीला त्याने बंदिस्त केल्यामुळे वाली मृत्यूस पात्र आहे. मी वालीचा वध करून तुझी पत्नी आणि तुझे राज्य तुला मिळवून देईन.''   






ठरल्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण यांसह सुग्रीव किश्किंदला गेला आणि वालीला युद्धासाठी आव्हान केले. आधीच चिडलेला वाली सुग्रीवला पहाताच अतिशय क्रोधाने त्याच्यासमोर उभा राहिला. दोघांमध्ये युद्ध चालू झाले. इकडे झाडाच्या आडोशाला असलेले राम आणि लक्ष्मण भ्रमात पडले; कारण वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये इतके साम्य होते की, त्यांना ओळखणे कठीण झाले. नंतर खुणेसाठी रामाने सुग्रीवला गळयात घालण्यासाठी फुलांचा एक हार दिला. आपल्या पाठीशी राम असल्यामुळे तो हार गळयात घालून अतिशय आत्मविश्वासाने सुग्रीव युद्ध करू लागला. काही वेळानंतर सुग्रीव युद्धामध्ये हतबल होत असलेला पाहून रामाने आपल्या बाणाने वालीला ठार केले. छातीत घुसलेल्या रामाच्या बाणामुळे वाली धाडकन् भूमीवर कोसळला आणि मरण पावला. शेवटच्या क्षणी मात्र त्याने राम आणि सुग्रीव यांच्याकडे क्षमायाचना केली.


गणपतीचे मारक रूप

गणपतीचे मारक रूप 



बालमित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपतिबाप्पाची गोष्ट पहाणार आहोत. आपल्याला गणपतिबाप्पाचा सदैव आशीर्वाद देणारा हात, करुणामय दृष्टी, असे तारक रूप ठाऊक आहे. त्याच्या मारक रूपासंबंधीच्या या कथेत गणपतीने असुरांचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासापासून कसे वाचवले ते आपण पाहूया.

        सिंधुरासुर नावाचा एक राक्षस होता. तो अतिशय शक्तीशाली होता. त्याचे सैन्यही अफाट होते. इतरांना त्याच्यापुढे नेहमीच पराभव पत्करावा लागे. तो देवतांना त्रास देत असे. ऋषीमुनींच्या यज्ञयागात, तपात तो नेहमी अडथळे आणत असे. त्याच्या जाचाला कंटाळून देवता आणि ऋषीमुनी यांनी मिळून त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला; पण अशा शक्तीशाली असुराला मारणार कोण, असा सर्वांना प्रश्न पडला. तेव्हा पराशरऋषी गणपतीकडे गेले आणि त्यांनी त्याला सिंधुरासुराचा वध करण्याची विनंती केली.
        गणपति उंदरावर आरूढ झाला आणि आपले सैन्य घेऊन स्वारी युद्धाला निघाली. दुरून गणपति येत आहे, हे सिंधुरासुराच्या पहारेकऱ्यांनी पाहिले. त्यांनी ही गोष्ट जाऊन सिंधुरासुराला सांगितली. सिंधुरासुराला त्याच्याशी कोणीतरी लढायला येत आहे, हे ऐकून फार आश्चर्य वाटले. गणपतीसारखा छोटासा बालक माझ्याशी लढणार, या विचाराने त्याला हसू आले. 






एवढ्यात गणपति त्याच्यासमोर येऊन उभा ठाकला. त्याने सिंधुरासुराला युद्धासाठी पुकारले. सिंधुरासुर त्याला धरून चिरडणार एवढ्यात गणपतीने आपला चमत्कार दाखवला. त्याचे रूप राक्षसाच्या दुपटी-तिपटीने वाढले. गणपतीने त्याला उचलले आणि मारायला प्रारंभ केला. राक्षस रक्तबंबाळ झाला. हे पाहून सिंधुरासुराच्या सैन्याने तेथून धूम ठोकली. सिंधुरासुराच्या लाल रक्ताने गणपतीचे अंग भिजले. तो लाल-शेंदरी दिसत होता. अखेर सिंधुरासुराचा अंत झाला आणि गणपतीचा राग शांत झाला. शक्तीशाली सिंधुरासुरावर बालगणपतीने विजय मिळवला, हे पाहून सर्व देवतांना त्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्याचा जयजयकार केला.
        असाच एक अंगलासुर नावाचा दुष्ट राक्षस होता. तोही सिंधुरासुराप्रमाणे सर्वांना त्रास देत असे. अंगलासुर तोंडातून आग फेकत असे. त्याच्या दृष्टीस जे जे पडे, तो ते जाळून टाके. त्याच्या डोळयांतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत. तोंडातून धुराचे लोट उसळत. सर्वांना त्याची फार भीती वाटत असे.
        अंगलासुराने अशी अनेक जंगले जाळली होती. शेतातली पिके, जनावरे, पशुपक्षी, माणसे यांना जाळून तो त्यांची राख करी. अनेक राक्षसांना गणपतीने मारले आहे, हे अंगलासुराला ठाऊक होते. त्याला गणपतीचा सूड घ्यायचा होता. गणेशाचा वध करायचा होता; म्हणून तो त्याच्या शोधात होता; पण गणपति त्याच्या हाती लागत नव्हता. 


एके दिवशी श्री गणेशाने आपले छोटे रूप पालटले. तो अंगलासुराच्या तिप्पट उंच झाला. हे पाहून राक्षस घाबरला. श्री गणेशाने त्या राक्षसाला हातात उचलले आणि सुपारीसारखे खाऊन टाकले. त्यामुळे गणेशाच्या अंगाची भयंकर आग होऊ लागली. ती आग न्यून करण्यासाठी सर्व देवता आणि ऋषीमुनी यांनी त्याला दूर्वा वाहिल्या. दुर्वांनी आग थांबली आणि गणपति शांत झाला.
        पुढे गणेशाने विघ्नासुर या राक्षसाचाही नाश केला; म्हणून त्याचे विघ्नेश्वर हे नाव पडले.

महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी

महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी 



नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा किंवा महाकाली या देवीची प्रतिष्ठापना करतात आणि नऊ दिवस दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला जातो. आज आपण दुर्गादेवी महिषासुरमर्दिनी कशी झाली, यासंबंधीची कथा पाहूया.

        फार पूर्वी महिषासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांचा अतिशय छळ करत असे. एकदा त्याने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध केले आणि इंद्राला पराजित करून त्याचे स्थान बळकावले. इंद्राला पराभूत केल्यामुळे महिषासुराला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला. तो सर्वांशी अधिकच उन्मत्तपणे वागू लागला. महिषासुराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अत्याचार पाहून सर्व देवांनी एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना प्रार्थना केली अन् या संकटातून सोडवून महिषासुराला कायमचा धडा शिकवण्यास विनवले. 


तिन्ही देवांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तीने मिळून एक देवी निर्माण केली. शंकराच्या तेजाने देवीचे मुख, विष्णूच्या तेजाने हात आणि अग्नीच्या तेजाने तीन डोळे निर्माण झाले. अशा प्रकारे प्रत्येक देवाने देवीचा एकेक अवयव सिद्ध केला आणि त्यातून साक्षात् दुर्गादेवीची निर्मिती झाली. शिवाने आपला त्रिशूळ, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र, अशी विविध आयुधे सर्व देवांनी तिला बहाल केली.
        देवांच्या तेजापासून निर्माण झालेल्या या सर्वशक्तीमान दुर्गादेवीने महिषासुराला मारण्यासाठी रौद्र रूप धारण केले. महिषासुर आणि दुर्गा यांच्यात नऊ दिवस घनघोर युद्ध झाले. दुर्गादेवीने आपल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गादेवीला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले. या प्रसंगाची आठवण म्हणून आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. 






मुलांनो, आपण नवरात्रीचा उत्सव का साजरा करतो, ते कळले ना ! मग त्या दिवसांत आजकाल चालणाऱ्या गरब्याविषयी तुम्हाला काय वाटते ? धांगडधिंगा घालून मोठमोठ्या आवाजात गाणी लावून अंगविक्षेप करून नाचणे योग्य आहे का ? याविषयी तुम्ही इतरांचे प्रबोधन करून हिंदु धर्माविषयी ज्ञान देऊ शकता.

भक्त प्रल्हाद

भक्त प्रल्हाद 




हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की, त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. 'देवांपेक्षा मीच मोठा', असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. 'नारायण नारायण' असा जप करतच तो दैनंदिन कामे करी. वडिलांना देवाचा जप केलेले आवडत नाही; म्हणून प्रल्हाद त्यांच्यासमोर येतच नसे. तरीपण कधीतरी राजाची प्रल्हादाशी गाठ पडे. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी. 


Read Love Stori ( Please Add Skeep ) ........................... 



एके दिवशी नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला राजा येत आहे, हे कळलेच नाही. राजाने नामजप ऐकताक्षणीच सेवकांना आज्ञा केली की, डोंगराच्या उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा. सेवकांनी तसे केले आणि राजाला कळवले. थोड्याच वेळात राजवाड्याच्या आगाशीत उभ्या असलेल्या राजाला प्रल्हाद दुरून राजवाड्याकडे येतांना दिसला. प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला. काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून 'प्रल्हाद राजवाड्यात येताक्षणी त्याला माझ्यासमोर उभे करा', अशी त्याने सेवकांना आज्ञा केली. राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला. राजाने त्याला विचारले, ''सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले कि नाही ?'' प्रल्हादाने उत्तर दिले ''हो.'' राजाने पुन्हा विचारले, ''मग तू इथे परत कसा आलास ?'' तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला, ''मी एका झाडावर अलगद पडलो. झाडावरून उतरलो. तेथूनच एक बैलगाडी जात होती. तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो. का कुणास ठाऊक; पण माझ्यासमवेत सतत कुणीतरी आहे, असे मला वाटत होते; म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो.'' राजा निराश झाला. त्याने प्रल्हादाला जायला सांगितले. 


Read Jok ( Please Add Skeep ) ....................... 




काही दिवस उलटले. राजाच्या खास लोकांसाठी जेथे जेवण सिद्ध केले जाते तेथे प्रल्हाद काही कामासाठी गेला असता त्याच वेळी तेथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली. प्रल्हाद 'नारायण नारायण' असा नामजप करत चालला होता. पुन्हा राजा रागावला. त्याने सेवकांना आज्ञा केली की, जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या. सेवक घाबरले; कारण प्रल्हादाला तेलात टाकतांना उकळणारे तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली; पण काय करणार ? राजाज्ञा ऐकायलाच हवी; म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. 'आता याला कोण वाचवतो', हे बघायला या वेळी राजा स्वत: उपस्थित राहिला. चारही बाजूंनी उकळते तेल उडाले. सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले; पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता. राजा पहातच राहिला. बघता बघता कढईत कमळ दिसू लागले. त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता. पुन्हा राजा चिडला. रागाने आपल्या परिवारासह निघून गेला. 



Read Samaj Stori ( Please Skeep Add )............................... 



राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, ''बोल, कुठे आहे तुझा देव ?'' प्रल्हादाने सांगितले, ''सगळीकडे.'' राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, ''दाखव तुझा देव या खांबात.'' तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला; कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता.

        मुलांनो, प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण केले. आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धाऊन येईल.

राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच!

राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच!  

 

 

एकदा श्रीराम आणि सीतामाता यांना भेटण्यासाठी हनुमान येतो आणि त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतो. तेव्हा सीतेला वाटते, हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे. तो नेहमी त्यांची सेवा करतो. त्याला आपण काहीतरी द्यावे. असे वाटून ती आपल्या गळयातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. माझ्याकडून तुला ही मोत्याची माळ देते आहे.

        ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो. माळेतील एकेक मणी काढतो आणि प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो. नंतर प्रत्येक मणी फोडतो, बघतो आणि टाकतो. असे करत माळेतील सर्व मणी तो फोडून टाकतो.
        हे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीतामातेला राग येतो. तुला प्रेमाने दिलेल्या माळेचे हे काय केलेस ? प्रत्येक मणी फोडलास. तू असे का केलेस ?
        तेव्हा हनुमंत म्हणतो, मला काही केल्या माळेत आणि माळेतील कोणत्याही मण्यात कोठेच राम दिसला नाही. मला माझा राम कोठे दिसतो का ते मी बघत होतो. ज्याच्यात राम नाही ते सर्व मी टाकून दिले. 





मारुतीरायाचे बोलणे ऐकल्यावर सीतेला समजते की, आपण माळ दिली, असे जे आपल्याला वाटले ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी ही माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो.
        ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळयात घालतो.
        मुलांनो, जी गोष्ट देवाचे स्मरण करून केली जाते, तीच गोष्ट हनुमानाला आवडते. आपणही प्रत्येक कृती करतांना कुलदेवीचे स्मरण करून आणि प्रार्थना करूनच केली पाहिजे.

 

श्रेष्ठ ईश्वरभक्ती

श्रेष्ठ ईश्वरभक्ती 



नारदमुनींना एकदा त्यांच्या भक्तीचा फार गर्व झाला. त्यांना वाटले की, आपण सतत 'नारायण नारायण' असा जप करत असतो. देवाचा आपल्याइतका खरा भक्त त्रिखंडात कोणीही नाही. ही गोष्ट भगवान विष्णूला समजली. आपल्या भक्ताला गर्व होऊ नये; म्हणून देव नेहमीच भक्ताची काळजी घेत असतो. नारदाचा गर्व नाहीसा करावयाचा, असे देवाने ठरवले.

        एक दिवस नारदमुनी विष्णूकडे गेले असता विष्णूने नारदांना विचारले, ''देवर्षी, तुम्ही जेव्हा पृथ्वीवर जाता, तेव्हा तेथे असलेल्या माझ्या भक्तांची भेट घेता का ? तेथे माझा एक खरा भक्त रहातो.'' हे ऐकून नारदमुनी विचारात पडले. त्यांना वाटले, 'आपल्यापेक्षा खरा भक्त कोण असणार ?' 




कोण खरा भक्त आहे, हे पहाण्यासाठी नारदमुनींनी विष्णूकडून त्याची सगळी माहिती घेतली आणि ते पृथ्वीवर सांगितलेल्या ठिकाणी आले. विष्णूने सांगितलेला खरा भक्त एक साधा शेतकरी होता. त्यांना आश्चर्य वाटले. नारदमुनी सबंध दिवस तो शेतकरी काय करतो, हे पहात राहिले. सकाळी तो लवकर उठायचा. देवाचे नामस्मरण करायचा. दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री झोपतांना 'देवा, आज तुझ्यामुळे मी माझं काम करू शकलो. तुझ्याच कृपेने आजचा दिवस चांगला गेला. अशीच कृपा माझ्यावर सतत राहू दे', अशी प्रार्थना करून झोपी जायचा. हे पाहून नारदमुनींना तर गंमतच वाटली. हा दिवसातून एकदा नाम घेतो आणि प्रार्थना करतो. मी देवाचे अखंड नाम घेतो, मग हा खरा भक्त कसा ? नारदमुनी पुन्हा एकदा भगवान विष्णूकडे गेले. त्यांनी विचारले, ''देवा, आपण त्याला खरा भक्त कसे म्हणता, हे काही मला समजले नाही.'' त्यावर श्रीविष्णु हसले. ते नारदमुनींना म्हणाले, ''नारदा, तुम्ही एक काम करा. ही तेलाने भरलेली वाटी आहे. ती कैलास पर्वतावर भगवान शंकराला नेऊन द्या.'' नारदांनी ती वाटी घेतली. तेलाचे भांडे काठोकाठ भरलेले असल्याने वाटेत तेल सांडू नये; म्हणून नारदांचे सर्व लक्ष तिकडे लागले. त्यामुळे विष्णूचे नाव घेणे तसेच राहिले. ती वाटी त्यांनी भगवान शंकराला दिली तेव्हा त्यांना हायसे वाटले. 


ते परत विष्णूकडे आले. विष्णु म्हणाले, ''काय नारदा वाटी नेऊन दिलीत ? तेल सांडले नाही ना ?'' नारद म्हणाले, ''नाही, तेल न सांडता वाटी दिली.'' यावर विष्णूने विचारले, ''वाटेत किती वेळा माझे नामस्मरण केले ?'' नारद एकदम ओशाळले. ते म्हणाले, ''त्या वाटीकडे लक्ष असल्यामुळे मी नामस्मरण करायचे विसरूनच गेलो.'' त्यावर विष्णु म्हणाले, ''तुम्ही प्रतिदिन सारखेच माझे स्मरण करता; पण मृत्यूलोकी जातांना तुम्हाला माझी आठवण तरी झाली का ? तुम्ही नुसते भांडे नेतांनाही मला विसरलात; पण तो शेतकरी एवढे संसाराचे जंजाळ पाठीशी असतांनाही मला विसरत नाही. मग श्रेष्ठ कोण ते तुम्हीच ठरवा.'' हे ऐकून नारदला काय ते उमगले.
        मुलांनो, संसारात राहून नामस्मरण करत आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडणे, ही श्रेष्ठ  ईश्वरभक्ती होय.