Monday 11 March 2013

हनुमान

हनुमान 




 

तिथी

           काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. जन्माचा इतिहास राजा दशरथाने पुत्रप्राप्‍तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.
  



उत्सव साजरा करण्याची पद्धत

        या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.
 

हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीतजास्त का करावा ?

          `हनुमान जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो. 

पुत्र व्हावा ऐसा गुंडा । त्याचा ब्रम्हांडी ( तिन्ही लोकी ) झेंडा ।।
की जन्मताच अशी सुखद परिचित अंजनी मातेला देणारा हनुमान

जन्मताच सूर्याकडे झेप :  राजा दशरथाने पुत्रप्राप्‍तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : 

अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने    आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.         जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे. 





कठोर आराधनेमुळे अंजनाच्या पोटी शंकराचा जन्म

        मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्‍वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्‍वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो.



Udan Stori ( Please Add Skeep ) ......................




महापराक्रमी

अ. राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले - `वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता, सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.' हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धुम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य वीरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरी आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.




आ. अत्यंत बलशाली असलेल्या हनुमानाने सीतेच्या शोधासाठी ३२ किलोमीटर समुद्री अंतर पोहून पार केले. याबाबत वाल्मीकी रामायणात स्पष्ट उल्लेख आहे

यं यं देशं समुद्रस्य जागाम स महाकपि: ।
तस्य तस्योरुवेगेन सोन्माद इव लक्ष्यते ।। 


अर्थ : महाकपि (हनुमान) समुद्राच्या ज्या भागातून जात होता, तो भाग त्याच्या मांड्यांच्या वेगामुळे उन्मत्त झाल्यासारखा वाटत होता. यावरून हनुमानाच्या सामर्थ्याची आपण कल्पना करू शकतो. - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य)
 

अनेक कला, नैपुण्य, गुण, यांचा समुच्चय

अ. `ज्ञान-विज्ञान, कलासंपन्न व प्रगत अशा जातीचा प्रमुख नेता हनुमान उच्च विद्याविभूषित, ज्योतिषशास्त्र व अनेक कला यांचा ज्ञाता होता. बल, बुद्धी, विद्या, शौर्य व पराक्रम या अद्वितीय गुणांचा तो धनी होता. `हनुमान हा भाषाकोविद असून वेद व व्याकरण त्याने अभ्यासिले असावेत', असे मत स्वत: श्रीरामाने प्रकट केले आहे.




आ. वीणावादक असलेल्या हनुमानाची शास्त्रीय संगीतातील तीन प्रमुख संगीताचार्यांत गणना केली जाते. (अन्य दोन संगीताचार्य शार्दुल व कहाल होत.) `संगीत परिजात' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ हनुमानाच्या संगीत सिद्धांतावर आधारित आहे. त्याने प्रतिपादलेल्या `हनुमत् संगीत पद्धती'ला भारतीय शास्त्रीय संगीतात विशिष्ट स्थान आहे. त्याचे व्यक्‍तीमत्त्व म्हणजे भक्‍ती, शक्‍ती व युक्‍ती यांचा अपूर्व संगम होय. या श्रेष्ठ व्याकरणकाराचे व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, वार्तिक, भाष्य व संग्रह इत्यादींवर असामान्य प्रभुत्व होते.' - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य, पृष्ठ २१)

ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचे प्रतीक असलेला हनुमंत !

        हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्‍ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्याच्यात स्थितीचे (तारक) सामर्थ्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव-पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.

भूत, राक्षस यांसारख्या वाईट शक्तींपासून रक्षण

अ. सगळया देवतांमध्ये फक्‍त मारुतीला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला `भुतांचा स्वामी' म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.



Read Agrowon ( Please Add Skeep ) ............................


आ. लग्न न होणार्‍यांपैकी जवळजवळ ३० टक्के व्यक्‍तींचे लग्न भूत, करणी इत्यादी वाईट शक्‍तींच्या त्रासामुळे होत नाही. मारुतीच्या उपासनेने ते त्रास दूर होतात व लग्न होणे शक्य होते. (१० टक्के व्यक्‍तींचे लग्न भावी वधू किंवा वर याच्या अवास्तव अपेक्षा असल्याने होत नाही. त्या संदर्भात अपेक्षा कमी केल्या की लग्न होते. ५० टक्के व्यक्‍तींचे लग्न प्रारब्धामुळे होत नाही. प्रारब्ध मंद किंवा मध्यम असल्यास कुलदेवतेच्या उपासनेने प्रारब्धामुळे असणारा अडथळा नष्ट होऊन लग्न होऊ शकते. तीव्र प्रारब्ध असल्यास केवळ संतकृपेनेच लग्न होऊ शकते. उरलेल्या १० टक्के व्यक्‍तींचे लग्न इतर आध्यात्मिक कारणांमुळे होत नाही. त्यासाठी त्या त्या कारणाप्रमाणे उपाय योजावे लागतात.

देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण)

देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण) 



 

  द्यूतक्रीडेत हारल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला राज्यसभेत आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुःशासनाने तिला राज्यसभेत फरफटत ओढत आणले. ती असे न करण्यासाठी विनवत होती; पण त्याचा काहीएक परिणाम त्यांच्यावर झाला नाही. द्रौपदीला वाटले, ‘माझे पाच पती आहेत. संपूर्ण जगाला ते भारी आहेत. ते माझे नक्कीच रक्षण करतील.’ तिने युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या सर्वांना साहाय्य करण्याची विनंती केली; पण कोणीच पुढे आले नाही. तिने सर्व ज्येष्ठांनाही हाक मारली; परंतु सगळे माना खाली घालून बसले होते. शेवटी तिने श्रीकृष्णाला हाक मारली. तो लगेच धावून आला. तिला वस्त्रे पुरवली आणि तिचे रक्षण केले. तिने श्रीकृष्णाला विचारले, ‘‘देवा, मी संकटात असल्याचे कळूनही तू मला साहाय्य करण्यास का आला नाहीस ?’’ त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘तुला तुझ्या पतींवर विश्वास होता ना, तू त्यांना बोलावले; मग मी कसा येणार ? तू मला हाक मारताच मी आलो.’’ द्रौपदीने श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. 

Raed Samaj Stori ( please Add Skeep ) ........................ 



तात्पर्य : देवाविना आपले कोणी नसते़  आपण ज्यांना आपले म्हणतो, तेही साहाय्याच्या वेळी येत नाही. एखाद्याला पुनःपुन्हा हाक मारली, तर एकदातरी त्या व्यक्तीला वळून मागे बघावेच लागते. देव मात्र एका हाकेला धावून येतो; पण आम्ही त्याला सोडून सर्वांना हाक मारत बसतो. आपण देवाला सतत हाक मारली, तर तो सतत आपल्यासमवेत राहाणार नाही का ? मग आतापासून नामजप करणार ना ?

भवसागर तरून नेणारा नावाडी - श्रीराम

भवसागर तरून नेणारा नावाडी - श्रीराम 




         ‘कैकयीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभु रामचंद्र आपला भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह वनवासाला निघाले. वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले. तो धावत धावत त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्यापुढे लोटांगण घालून म्हणाला, "प्रभु, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो ! मी आपली कोणती सेवा करू ?''

         रामप्रभु म्हणाले, "गुहका, तुझ्याकडून दुसर्‍या कुठल्याच प्रकारच्या सेवेची आम्ही अपेक्षा करत नाही. केवळ तुझ्या नावेतून तू आम्हाला गंगेच्या पैलतिराला पोहोचव.'' त्याप्रमाणे गुहकाने त्या तिघांना पैलतिराला नेऊन सोडले. पैलतिरी पोहोचविल्यावर त्यांच्यात पुढील संवाद झाला.
राम : गुहका, नावेतून आम्हाला पैलतिराला पोहोचविल्याबद्दल मी तुला काय देऊ ?
गुहक : प्रभु, एक न्हावी दुसर्‍या न्हाव्याचे केस कापतो, तेव्हा तो त्याच्याकडून मोबदला घेतो का ?
राम : नाही.
गुहक : प्रभु, एक वैद्य दुसर्‍या वैद्याला औषध देतो, तेव्हा तो त्याच्याकडून औषधाचा मोबदला घेतो का ? 

राम : नाही.
गुहक : मग त्याचप्रमाणे मी आणि आपण असे दोघेही नावाडी असतांना मी आपल्याकडून मोबदला कसा काय घेऊ ?
(गुहकाच्या या विधानाने राम आश्चर्यचकित झाला.)
राम : गुहका, तू नावाडी आहेस, हे उघडच आहे; पण तू मलाही नावाडी कसे काय करून टाकलेस ?
गुहक : प्रभु, मी लोकांना या नदीच्या पैलतिराला पोहचवितो; पण आपण तर इच्छुक प्रवाशांना भवसागराच्या, म्हणजे संसाररूपी सागराच्या पैलतिराला नेऊन पोहोचते करता. तेव्हा आपण माझ्यापेक्षाही श्रेष्ठ नावाडी नाही का ?

        गुहकाचा हा युक्तीवाद ऐकून आणि त्याचे निरपेक्ष प्रेम पाहून रामप्रभूंनी त्याला दृढ आलिंगन दिले. रामप्रभूंकडून अलिंगन सुख म्हणजे प्रत्यक्ष जिवा-शिवाची भेट. गुहकाला आपले जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले. गुहकाला राम हा अवतार आहे, हे लक्षात आले. यावरून त्याचा आध्यात्मिक स्तर किती उच्च असला पाहिजे, हे लक्षात येते.’
- डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)  

मच्छिंद्रनाथांचा जन्म

मच्छिंद्रनाथांचा जन्म 



एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक नारदमुनी तेथे आले. गौरीची व्यथा ऐकून त्यांनी अंतज्र्ञानाने शिवाचा शोध घेऊन त्याचे बसण्याचे ठिकाण तिला सांगितले. गौरीने शिवासमोर भिल्लिणीच्या वेषात जाऊन संगीतप्रधान नृत्याला सुरुवात केली.

त्या आवाजाने शिवाची समाधी उतरली. त्याने स्मित करत तिला विचारले, ‘‘शाबरी, तू मला दिव्य समाधीतून जागृत का केलेस ?’’ तेव्हा शाबरी म्हणाली, ‘‘आपण वर्षभर मला सोडून या समाधीवस्थेत कसे राहिलात, या गोष्टीचे मर्म मला जाणून घ्यायचे आहे.’’ शिव म्हणाला, ‘‘सांगीन; परंतु आता इथे नाही. जेथे मानवाची वस्ती नसेल आणि जेथे ते रहस्य कुणी ऐकणार नाही, अशा ठिकाणी मी ते तुला सांगीन.’’ काही दिवस गेल्यावर गौरीने शिवाला त्या गोष्टीची आठवण करून दिली. शिव तिला घेऊन निबिड जंगलात यमुनानदीच्या किनारी आला आणि ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागला; कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती.  


 
त्याच वेळी यमुना नदीतील एका मत्स्यीने ब्रह्मतेज गिळले होते. कवी नारायणांनी त्या तेजात जीवरूपाने प्रवेश केला आणि तिचा गर्भ दिसामासी वाढू लागला. शिव सांगत असलेले गूढ मत्स्यीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले. भगवान शंकराने आपल्या उपदेशाचे सार पार्वतीला विचारताच मच्छिंद्रनाथ मत्स्यीच्या पोटातून म्हणाले, ‘सर्वत्र एक ब्रह्मच भरून राहिले आहे, हेच आपल्या उपदेशाचे सार आहे.’
हे वाक्य ऐकताच कवी नारायण मत्स्यीच्या पोटी जन्म घेणार असल्याचे शंकराने ताडले आणि त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘मच्छिंद्रा, तुम्ही पुढे बदि्रकाश्रमी आल्यावर याच मंत्राचा उपदेश मी दत्तात्रेयांच्या मुखातून तुम्हाला करवीन.’’ मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देत त्यांनी त्यांना हठयोगाचा उपदेश केला आणि जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितले.
त्यानंतर पूर्णमास भरताच मत्स्यीच्या उदरातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला.

विमानाचा शोध लावणारे भारद्वाजऋषी !

विमानाचा शोध लावणारे भारद्वाजऋषी ! 



परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार

परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार 



 


परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही.
 

आईवडील

        परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला.
    



कार्य

अधम अशा क्षत्रियांचा वध : `वाल्मीकीने त्याला `क्षत्रविमर्दन' न म्हणता `राजविमर्दन' म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.'
           कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व तिचे वासरू पळवून नेले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परत आल्यावर त्याला हे कळताच त्याने कार्तवीर्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. नर्मदेच्या तीरी त्या दोघांत द्वंद्वयुद्ध झाले. त्यात परशुरामाने त्याला ठार मारले. यानंतर आपले पिता जमदग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे तो तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेला.
            परशुराम गेल्यावर कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहयांनी जमदग्नीऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांची हत्या केली. हा वृत्तान्त समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचला. जमदग्नींच्या शरिरावरील एकवीस जखमा पाहून त्याने तत्क्षणी प्रतिज्ञा केली की, `हैहय व इतर क्षत्रियाधमांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय करीन.' या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करावा, युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावे, क्षत्रीय माजले की, पुन्हा त्यांचा नाश करावा, अशा एकवीस मोहिमा केल्या. समंतपंचकावर शेवटचे युद्ध करून त्याने आपला रक्‍ताने माखलेला परशू धुतला व शस्त्र खाली ठेवले.

Read agriculture ( Please Skeep Add ) ..............................


क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित करणे : परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्‍तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित केली.
  

     अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे व पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज व क्षात्रतेज अशी दोन्ही तेजे आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास शाप देऊन अथवा बाणाने परशुराम हरवील.
तेज रामात संक्रमित करणे : एकदा (दशरथपुत्र) रामाची कीर्ती ऐकून त्याच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी परशुराम त्याच्या वाटेत आडवा आला व आपले धनुष्य रामाच्या हातात देऊन ते वाकवून त्याला बाण लावून दाखवण्यास सांगितले. रामाने तसे केले व हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. `माझी या (काश्यपी)भूमीवरची गती निरुद्ध कर', असे परशुरामाने सांगितल्यावर रामाने तसे केले. या प्रसंगी परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामाने धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.
धनुर्विद्येचा सर्वोत्तम शिक्षक : एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्र्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते.
दानशूर : परशुरामाने ज्या क्षत्रीयवधासाठी मोहिमा केल्या, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर त्याचे स्वामित्व आले. त्यामुळे त्याला अश्वमेध यज्ञाचा अधिकार प्राप्‍त झाला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी या यज्ञाचा अध्वर्यु कश्यप याला परशुरामाने सर्व भूमी दान केली.


भूमीची नवनिर्मिती : जोपर्यंत परशुराम या भूमीत आहे, तोपर्यंत क्षत्रीय कुळांचा उत्कर्ष होणार नाही, हे जाणून कश्यपाने परशुरामाला सांगितले, `आता या भूमीवर माझा अधिकार आहे. तुला इथे रहाण्याचाही अधिकार नाही.' यानंतर परशुरामाने समुद्र हटवून स्वत:चे क्षेत्र निर्माण केले. वैतरणा ते कन्याकुमारीपर्यंत असलेल्या या भूभागाला `परशुरामक्षेत्र' ही संज्ञा आहे.
         परशुराम हा सप्‍तचिरंजीवांपैकी एक आहे.
 

Read Children Stori ( Plese add Skeep ) ....-.......-......-


परशुरामक्षेत्रे

        सह्याद्रीच्या उत्तर टोकावर साल्हेरच्या डोंगरावरील मध्ययुगीन गडावर, पंजाबात कांगडा जिल्ह्यामध्ये, कोकणात चिपळूणपासून पाच मैलांवरील एका डोंगरावर तसेच गोमंतकात काणकोण येथे परशुरामाचे एक पुरातन मंदिर आहे.
 

मूर्ती

        भीमकाय देह, मस्तकी जटाभार, खांद्यावर धनुष्य व हातात परशू अशी परशुरामाची मूर्ती असते.
 

पूजाविधी

        परशुराम हा श्रीविष्णूचा अवतार असल्याने तो उपास्यदेवता म्हणून पुजला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी परशुराम जयंती एक कात व उत्सव म्हणून साजरी केली जाते.  


बौद्धयन

Article Image बौद्धयन

५०० वर्षांपूर्वी (खिस्तपूर्व ५००) ‘पायथागोरस सिद्धांत’चा वेध घेणारा भारतीय भूमितीतज्ज्ञ. सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारतीय भूमितीतज्ज्ञांनी भूमितीशास्त्रात महत्त्वाचे संशोधन केले. 
 
 
 
 

औषध-निर्मितीतील पितामह : आचार्य चरक !

Article Image औषध-निर्मितीतील पितामह : आचार्य चरक !

इ.स. पूर्व १०० ते २०० वर्षांपूर्वीच्या कालखंडातील आयुर्वेदतज्ज्ञ म्हणजे चरकाचार्य. ‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेदशास्त्रावरील ग्रंथाचा निर्माणकर्ता. चरकाला ‘काया चिकीत्सक’ 
 
 
 
 
 

शल्यकर्मांत निष्णात असणारे महर्षी सुश्रुत

Article Image शल्यकर्मांत निष्णात असणारे महर्षी सुश्रुत

‘आयुर्वेद उपचारपद्धती जगाला १६ व्या शतकापर्यंत ज्ञात नव्हती. १६ व्या शतकात जर्मन डॉक्टरांनी भारताला भेट दिली. तेव्हा ‘सुश्रुताचार्य ‘रेनोप्लास्टिक सर्जरी’ त्यांच्या व्यवसायात वापरत होते’, असे त्यांना याविषयीचा अभ्यास करतांना आढळले. 







आर्यभट्ट

आर्यभट्ट 



 


पाचव्या शतकात सूर्य-चंद्र यांचे वेध घेणारे एक महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ. काळ इ.स. ४७६. पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची भ्रमणगती आणि परिभ्रमणगती यासंबंधी स्पष्ट कल्पना आर्यभट्ट यांनी त्या काळात मांडली. त्यांच्या या संशोधनामुळे भारताच्या पहिल्या उपग्रहास त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी ‘आर्यभटिका’ हा ग्रंथ लिहून सार्‍या जगात भारताचे नाव उज्ज्वल केले.  


Read vigyan ( Please Add Skeep ) ................... 


गॅलिलीओच्या १ हजार वर्षे आधीआर्यभट्टांनी
पृथ्वी गोल असल्याचे सांगणे व तिचा व्यासही सांगणे    

          आर्यभट्टांनी (इ.स. ५ वे शतक) आपल्या ‘आर्यभट्टीयम्’ नामक ग्रंथामध्ये प्रथम पृथ्वी गोल असल्याचा उल्लेख करून पृथ्वीचा व्यासही अचूक सांगितला.  

मृज्जलशिखिवायुमयो भूगोलः सर्वतो वृत्तः । - आर्यभट्टीयम्, ४-६ 

अर्थ : माती, पाणी, अग्नी व वायू यांनी युक्त अशी पृथ्वी गोल आहे.
        याच ग्रंथामध्ये ‘नृषियोजनं, ञिला भूव्यासो ........’ असे सूत्र आले आहे. याचा अर्थ ‘नर x षि · योजना व ‘ञिला’ योजनेएवढा पृथ्वीचा व्यास आहे’, असा होतो. यामधून पृथ्वीच्या व्यासाचे गणित सोडवण्यासाठी आपल्याला ‘आर्यभट्टीय अंक पद्धतीची’ आवश्यकता आहे. याच ग्रंथामध्ये ती दिली आहे. 





‘आर्यभट्टीय अंक पद्धती’ म्हणजे संक्षेपाने व सूत्ररूपाने ग्रंथ लिहिण्यासाठी तयार केलेली एक सांकेतिक भाषा. यामध्ये ‘क’ ते ‘म’ मुळाक्षरांना १ ते २५ असे आकडे दिले आहेत. म्हणजे क · १, ख · २, ग · ३ .... भ · २४, म · २५, य · ३०, र · ४०, ल · ५० ... ह · १००. स्वरांमध्ये ‘इ’कार म्हणजे ‘गुणिले १००’, ‘उ’ कार म्हणजे ‘गुणिले १०,०००’ व ‘ऋ’कार म्हणजे ‘गुणिले १०,००,००० (दहा लाख).’ अशा पद्धतीने अत्यंत सोपी अशी ही आर्यभट्टीय अंक पद्धती आपल्याला समजली की, ‘ञिला भूव्यासो’ या सूत्राचा अर्थ समजेल.
= १०, इ = x १००, ञि (ञ + इ) = १० x १०० = १०००
= ५० म्हणून ञिला = १००० + ५० = १०५०
म्हणजे पृथ्वीचा व्यास १०५० योजने एवढा आहे.         ‘नृषि योजना’ या सूत्रावरून १ योजन = किती किलोमीटर हे काढता येते. नृ x षि म्हणजे १ योजन. नृ म्हणजे माणसाची सरासरी उंची. (याचे प्रमाणही प्रस्तुत ग्रंथात दिलेले असून विस्तारभयास्तव येथे मांडलेले नाही.) षि =+= ८० x १०० = ८०००० म्हणजे १ योजन. माणसाची सरासरी उंची x ८०००० हे सर्व गणित करून त्या वेळी १ योजन म्हणजे १२.११ कि.मी. होते व ही संख्या जेव्हा ‘ञिला भूव्यासः’ या सूत्रामध्ये घालतो, तेव्हा आपल्याला पृथ्वीचा व्यास १२,७१६ कि.मी. एवढा मिळतो. आता उपग्रहांच्या सहाय्याने मोजलेला पृथ्वीचा व्यास १२७५६ कि.मी. आहे.’ 




आर्यभट्टांनी एका सूत्रावरून पृथ्वी किती अंशांनी कललेली आहे, हे सांगणे  

        ‘याच आर्यभट्टांनी ‘भ’ अपक्रमो ग्रहांशः ।’ या सूत्रावरून ‘पृथ्वी किती अंशांनी कललेली आहे’, हे सांगितले आहे. भ = २४ म्हणजेच पृथ्वी २४ अंशांनी कललेली आहे. आताच्या विज्ञानाने तीच संख्या (value) २३.५ अंश अशी सांगितली आहे.

वराहमिहिर

Article Image वराहमिहिर
ग्रहगोलांचा अभ्यास वैज्ञानिकदृष्टीने करणारे ५ व्या शतकातील एक थोर भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्र आणि फलज्योतिषविज्ञान या विषयांचा आचार्य वराहमिहिर यांचा गाढा अभ्यास होता.

Article Image नागार्जुन : भारतीय रसायनशास्त्राचे जनक

Article Image नागार्जुन : भारतीय रसायनशास्त्राचे जनक

भारतीय रसायनशास्त्राचे जनक. ७ व्या शतकाच्या प्रारंभातील शास्त्रज्ञ. सिद्ध नागार्जुन यांचे रसायनशास्त्रातील कार्य अविस्मरणीय आहे. विशेषत: सुवर्णाचा (सोने) पाठपुरावा आणि पार्‍यावरील त्यांचे संशोधन अतुलनीय होते.




devotional


Contage email

गर्गमुनी

गर्गमुनी 


Article Image


कौरव-पांडवकालीन तारका शास्त्रज्ञ गर्गमुनी यांनी नक्षत्राचा शोध लावला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जीवनाविषयी गर्गमुनी यांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले. कौरव-पांडव यांचे भारतीय युद्ध मानवसंहारक झाले; कारण युद्धाच्या प्रारंभीच्या पक्षामध्ये तिथीक्षय होऊन तेराव्या दिवशी अमावास्या आली होती. नंतरच्या पक्षातही तिथीक्षय होता. पौर्णिमा चौदाव्या दिवशी आली आणि त्यादिवशी चंद्रग्रहण होते, असे भविष्य गर्गमुनी यांनी वर्तविले होते. 

 

 

Read Marathi News ( Please Add Skeep ) .............. ........... 

 

जीवक

जीवक 


Article Image


  बुद्धकालीन म्हणजेच अंदाजे ३ सहस्र वर्षांपूर्वी जीवक हे वैद्यकशास्त्रात पारंगत असे शास्त्रज्ञ होऊन गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ज्ञान संपादन केले. आयुर्वेद, वैद्यक आणि वनस्पतीशास्त्र यांचे गाढे अभ्यासक. प्रत्यक्ष भगवान बुद्ध यांच्यावर त्यांनी औषधोपचार केले होते. भारतीय वैद्य परंपरेत बुद्धदेवाच्या परिवारातील एक निष्णात वैद्य म्हणून जीवक यांचे स्थान आहे. 

 

 

भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय... 

जगभरातील गणितींना विस्मयचकित करणारे ‘वैदिक गणित’ !

Article Image

जगभरातील गणितींना
विस्मयचकित करणारे ‘वैदिक गणित’ ! 




गोवर्धनपीठ, पुरीचे शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ यांनी अपरंपार परिश्रम आणि ध्यान यांद्वारे `अथर्ववेदा’तील `सुलभसूत्र’ (गणितसूत्र) परिशिष्टातील प्रत्येक अक्षरातून १६ सूत्रे हस्तगत केली. या १६ सूत्रांमुळे अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, सरळरेषा अन् गोलीय भूमिती, कॅलक्युलस, गतीशास्त्र, लोकस्थिती-गणित (स्टॅटिस्टीक्स) अशा सगळ्या शाखा अभ्यासणे सुलभ होते. प्रचंड संख्यांचे गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ, वर्ग करणे अतिशय सोपे होते. त्यांचा ‘वैदिक गणित’ हा ग्रंथ प्रकाशित झाला, तेव्हा सगळे जग स्तिमित झाले. आता ‘वैदिक गणिता’वर जगभरातील विद्यापिठांमधून संशोधन होत आहे.

        एका पहाणीनुसार अलीकडे भारतात उच्च अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशपरीक्षांमध्ये सहभागी होणारे बहुतांश विद्यार्थी ‘वैदिक गणित’ मोठ्या प्रमाणात वापरतात. व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठीची ‘कॅट’ आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठीची ‘गेट’ या परीक्षांमध्ये साध्या पद्धतीनुसार एखादे गणित सोडवण्यास चार मिनिटे लागत असतील, तर वैदिक गणितातील पद्धतींमुळे ते चार सेकंदांत सोडवता येते. 

कर्करोग प्रतिबंधित करणारे पातंजलीऋषींचे योगशास्त्र !

कर्करोग प्रतिबंधित करणारे
पातंजलीऋषींचे योगशास्त्र ! 


Article Image


‘पातंजलीऋषींनी २१५० वर्षांपूर्वी सांगितलेले ‘योगशास्त्र’, हा कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीवर सुपरिणामकारक उपचार असून योगसाधनेमुळे कर्करोग प्रतिबंधित होतो.’

- भारत शासनाच्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (‘एम्स’च्या) ५ वर्षांच्या संशोधनाचा निष्कर्ष !