रामभक्त हनुमान
रामभक्त हनुमान
एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत
होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, `सीतामाई, तू प्रतिदिन
हा शेंदूर का लावतेस ?' तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते;
कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे
आयुष्य वाढते.' हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, नुसत्या कपाळावर शेंदूर
लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया. मग
मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. तेव्हापासून
मारुतीचा रंग शेंदरी झाला.
No comments:
Post a Comment